Saturday 30 November 2013



आजचा सुविचार

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

आजची बोधकथा
एका गावात हिरामण आणि नारायण या नावाचे दोन शेतकरी राहत होते. दोघेही चांगले मित्र होते. हिरामण मोठ्या शेतजमिनीचा मालक होता तर नारायणाजवळ थोडी जमीन होती. पण

Friday 29 November 2013

      HARD QUESTIONS ABOUT SOFT OBEDIENCE 

          Some questions have risen up. The questions are with regard to the aspects of virtue and obedience. The propriety of the adage that obedience is the best virtue is the bone of contention.

राज्यस्तरीय शिक्षण परिषदेनंतर आलेल्या प्रतिक्रियांबद्दल

नमस्कार 
     दि.२५/११/२०१३ रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये सर्व शिक्षण तज्ञ, अधिकारी, पदाधिकारी व जेष्टांसमोर मला माझ्या छोट्याश्या कार्याची रूपरेषा मांडण्याची जि खूप मोठी संधी मिळाली हि संधी माझ्यासाठी एक आव्हान होती, पण
आजचा सुविचार
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
 आजची बोधकथा 
बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून

Thursday 28 November 2013

E-Learning


संगणकाच्या प्रयोगशाळेत जायचे, थोडा वेळ शिकायचे आणि तास संपला की वर्गाबाहेर यायचे. बहुतांश शाळांत असेच होते. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना संगणकाच्या प्रयोगशाळेतून बाहेर येणे अजिबात आवडत नाही. या शाळेतील संगणक प्रयोगशाळेचा सर्व कारभार विद्यार्थीच पाहातात. वेळप्रसंगी संगणक दुरुस्तीमध्येही विद्यार्थी मदत करत असतात.
शिरगावच्या या शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी न्यू कॅसल विद्यापीठाने 'सोल' (सेल्फ ऑर्गनायझिंग लर्निग एन्व्हायर्मेट) हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमांतर्गत

Wednesday 27 November 2013


आजचा सुविचार

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

आजची बोधकथा
बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही."

Sunday 24 November 2013

E-Learning

           आजचे युग हे संगणकाचे युग आहे. माहितीयुग म्हणूनही ते ओळखले जाते. या काळात आपली शिक्षणपद्धत कात टाकत आहे. शिक्षक, शिक्षणतज्ञ व एकूणच सर्वांना पुढील काळात स्वत:मद्ध्ये खूप बदल करावे लागणार आहेत. पास्चात्त्य देशात शैक्षणिक तंत्रज्ञानात खूप वेगाने बदल होत आहेत. या बदलांची चाहूल smartboard च्या रूपाने आपल्याला झाली आहे. इंटरनेटचा वापर घरी, शाळेत होऊ लागला आहे. youtube वरील व्हिडीओज दाखवून अध्यापन अधिक मनोरंजक, सखोल करावे लाहणार आहे. www.youtube.com/education वर आपल्याला भरपूर शैक्षणिक व्हिडीओज सापडतील.
         पाश्चात्त्य देशातील शैक्षणिक तंत्रज्ञानात होणारे बदल आपल्याला www.emergingedtech.com वर बघता येतील. khanacademy प्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी raviacademy.org ही वेबसाईट सुरू झाली आहे. आता खूपजणांकडे android phones आहेत. त्यावर storycreator हे app तुम्ही डाऊनलोड करून घेतले तर विद्यार्थ्याना digital स्वरूपात धडे शिकवू शकता. प्रश्न आहे तो एवढाच की बदलत्या काळाचे आव्हान पेलण्यास आपण तयार व सक्षम आहोत का? 
रविचंद्र माने, रहिमतपूर 
(मो. नं. ९९७५१६९५४३)


आजचा सुविचार

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

आजची बोधकथा
वीरगडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका गावात एकेवर्षी पाऊस पडला नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण गावातील मुखियाने आपल्याच लोंकाना त्या मदतीचा लाभ दिला. जेंव्हा रामचरण मदत मागण्यासाठी गेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला हाकलून दिले. रामचरणची पत्नी आणि मुलाने भुकेने तडफडून जीव टाकला. तेंव्हा रामचरणने वैराग्य स्वीकारले आणि एका साधूच्या दलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर भिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ खावूनपिवून चोऱ्या करीत असत. चुकीच्या संगतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी बनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोंकाना मूर्ख बनवीत असे. जेंव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामचरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकांनी रामचरणला पकडून राजापुढे उभे केले, राजाने त्याला या त्याच्या खोट्या वागण्याचे कारण विचारले, तेंव्हा रामचरण म्हणाला,"महाराज ! गावाच्या मुखीयाने तुमच्या पाठविलेल्या मदतीतून जर फक्त दोन भाकरी आणि पाणी जर मला दिले असते तर माझी बायको आणि मुलगा मरण्यापासून वाचले असते. तुमची मदत मिळाली नाही आणि ते दोघे भुकेने तडफडून मेले, ते दोघे जगले असते तर मी असा खोटारडेपणाने कधीच वागलो नसतो. लोकांचे ज्योतिष मी काय बघणार! मला माझे कुटुंब सांभाळता आले नाही, माझी व्यथा समजून घ्या. महाराज ! तुम्ही मदत पाठविली पण आमच्यापर्यंत ती आलीच नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे." त्याचे हे खरे बोलणे पाहता राजाने त्याचे गुन्हे लक्षात घेता त्याला सौम्य शिक्षा दिली व त्यानंतर त्याला त्या गावाचा मुखिया बनविले व जुन्या मुखीयाला कडक शिक्षा केली.
तात्पर्य-
संकटग्रस्त व्यक्तीला योग्यवेळी पोहोचलेली मदत योग्य ते कार्य साध्य करते, अन्यथा संकटात सापडलेल्या जीवांचा जीव जाण्याची शक्यता असते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे.

Saturday 23 November 2013

सी.एन.आर. राव

भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार क्रिकेटसूर्य सचिन रमेश तेंडूलकर आणि चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव यांना जाहीर केला आहे 
चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत...


आपले संपूर्ण आयुष्य विज्ञानाला वाहून घेतलेले आणि 'मिस्टर सायन्स ऑफ इंडिया' अशी ओळख असलेले ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सी.एन.आर. राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राव यांना याआधी पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवले आहेत. राव यांनी पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. चीन आणि भारत या देशांमधील वैज्ञानिक सहकार्य वाढीसाठी डॉ. राव यांचे मोठे योगदान आहे.
राव यांनी १९५१ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील एड्रू विद्यापीठात प्रवेश घेतला. १९६३ ते १९७६ या काळात कानपुर आयआयटीमधील रसायनशास्त्र विभागात, तर १९८४ ते १९९४ या काळात बेंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले. सध्या ते बेंगळुरातील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रात संशोधक प्राध्यापक आणि मानद अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.


त्यांचे जीवन, संशोधन, कार्य ,भूषवलेली मानद पदे यांविषयी अधिक माहीतीसाठी.....त्यांची स्वत:ची website...

http://www.jncasr.ac.in/cnrrao/

Friday 22 November 2013



आजचा सुविचार
माणसाने शक्य तो कधीच खोटे बोलू नये...याला दोन कारणे आहेत... एक म्हणजे एकदा खोटे बोलले कि ते लपवण्यासाठी पुन्हा अनेक वेळा खोटे बोलावे लागते.... आणि दुसरे कारण म्हणजे आपण कधी कोणाला काय खोटे बोललेलो आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे लागते...
-श्री.प्रशांत काटकर (९७६३१७७६९९)
आजची बोधकथा
आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली. दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते कि ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल कि त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. इतक्या सहजपणे तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण त्याने मला शांती दिली नाही. पैसा मी हि करू शकलो असतो त्या रत्नाचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती. कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या अध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या"

तात्पर्य-
मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.