Sunday, 25 September 2016

इयत्ता : ४ थी 
विषय : मराठी 
कविता या भारतात...
कवी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Monday, 5 September 2016

उद्याची स्किल्स...



- मुकुंद नाडगौडा

मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 - 02:15 AM IST


प्रगत तंत्रज्ञान आपल्या खिशात
मिटींग संपवून बाहेर पडलो होतो. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर खिशातून मोबाईल काढला, ‘ओला‘ चे अॅप उघडले, जीपीएस ऑन केला, माझे सध्याचे लोकेशन ठरवण्यासाठी इकडे-तिकडे नजर फिरवली. नेमके लोकेशन कळले नाही, पण त्या निमित्ताने अनेक मनोरंजक होर्डिंग्ज वाचावयास मिळाली. एवढे होईपर्यंत मोबाईल स्क्रीनवरचा मॅप स्वतःला अॅडजस्ट करत होता. अंमळ डावीकडे-उजवीकडे करत-करत त्याने मला अचूक लोकेशन दाखवले. मग मी “बुक नाऊ” बटन टॅप केले आणि पुढील यादीतून माझे इच्छित स्थळही टॅप केले. त्यानंतर अवघ्या काही सेकंदांत गाडीचा नंबर, ड्रायव्हरचे नाव आणि त्याचा फोटो मोबाईलच्या स्क्रीनवर आला. तो तीन मिनिटांत माझ्यापर्यंत पोहोचेल हेही समजले. दिलेल्या वेळेत गाडी आली. ड्रायव्हरला अॅपमधून इच्छित स्थळ कळलेच होते. तो मला रस्ता विचारात नव्हता, तर त्याच्या स्क्रीनवरील दिशादर्शकातील सूचनांनुसार गाडी चालवत होता. माहिती तंत्रज्ञानाच्या आगामी काळातल्या वाटचालीची ही एक छोटीशी झलक होती. यानिमित्ताने भविष्यकाळातील विविध रोजगारांचे स्वरूप आणि त्यांकरिता अत्यावश्यक असणारी काही मुलभूत कौशल्ये कशी असतील, यावर भाष्य करणे आवश्यक वाटू लागले. 
परिवर्तनाला प्रेरक व पोषक ठरणारे घटक
उद्याच्या विश्वात जी तांत्रिक आणि सामाजिक परिवर्तने अपेक्षित आहेत, त्या परिवर्तनांना प्रेरक आणि पोषक ठरणारे काही घटक आपल्याला पहायचे आहेत. ते घटक कोणते?

वाढते आयुष्यमान: गेल्या काही दशकांतील तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मनुष्याचे सरासरी आयुष्यमान वाढत आहे. त्यामुळे स्वतःच्या शारीरिक सक्षमतेकडे लक्ष देणारा आणि निवृत्तीनंतरही कार्यरत राहणारा ज्येष्ठ नागरिकांचा एक नवा वर्ग उदयाला आलेला आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा आणि  कौशल्यांचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे निकडीचे आहे. त्या दिशेने संबंधितांनी नवनवीन तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. 

नवनवीन तंत्रज्ञान आणि साधनांचे अविष्कार: आपले कार्यालय, कारखाना, घर आणि एकंदरच संपूर्ण दैनंदिन जीवन भावी काळात आपल्याला कल्पनाही करता येणार नाही एव्हढ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाने व्यापून गेलेले दिसणार आहे. आपल्या रोजचे कामांचा मोठा भाग ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ असलेली अनेक साधने व उपकरणे नियंत्रित करणार आहेत. विविध स्वयंचलित साधने आपली उत्पादकता व कार्यक्षमता वाढवणार आहेत. गेल्या आठ-दहा वर्षातला मोबाईल्स आणि संगणकांचा प्रवास पाहिल्यास यातील सत्यता पटेल.  

जगाचे “इलेक्ट्रॉनिक” परिवर्तन: गेल्या काही वर्षातील दूरसंचार क्रांती आता केवळ दूरध्वनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आज आपण एकाच मोबाईल संचाचा उपयोग संभाषण, संदेशवहन, ई-पत्रांची देवाण-घेवाण, छायाचित्रण, चलचित्रण, मनोरंजन, माहितीची साठवण,  फेसबुक किंवा ट्विटर सारखे सोशल मिडिया, व्हिडियो चॅटींग, इत्यादी अनेक कामांसाठी करत आहोत. पुढे जाऊन तिची आणखी व्याप्ती वाढणार आहे आणि याच साधनांचा उपयोग दूरशिक्षण व ई-शिक्षण, दूरनियंत्रणाद्वारे आपली अन्य उपकरणे यशस्वीपणे वापरणे, अश्या अनेक अभिनव उद्देशांकारिता केला जाईल. थोडक्यात, मानवी बुद्धी आणि ही साधने व इतर यंत्रे या सर्वांचा एक अभूतपूर्व संयोग झालेला दिसणार आहे. आणि यातून मनुष्य जीवनाची असंख्य परिमाणेच बदलून जाणार आहेत.

जवळ येत चाललेले जग: जागतिकीकरणाच्या या युगात जग तंत्रज्ञानामुळे ख-या अर्थाने जवळ आले आहे. भौगोलिक कक्षा कायम राहणार असल्या तरी, व्यावसायिक व सेवा क्षेत्राच्या कक्षा दिवसेंदिवस जवळ येत आहेत. संपर्काची सहज उपलब्ध साधने आणि सोशल मिडियाचा वाढता वापर आज प्रत्येकाला “कनेक्ट” करत आहे. जागतिकीकरणाचाच एक थेट परिणाम म्हणून व्यवसायाचे व उद्योगाचे नवे मार्ग अस्तित्वात आले आहेत. उदाहरणार्थ, बी.पी.ओ., के.पी.ओ., सेवा क्षेत्र, बँकिंग, विमा, आरोग्यसेवा, इत्यादी. यांमधील विस्तारीत क्षितिजांना आणि स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जायचे असेल तर तांत्रिक, भाषिक आणि अन्य वैश्विक कौशल्ये पुढील पिढीने आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच हा प्रवास “लोकल टू ग्लोबल” असा होणे अपेक्षित असेल, कारण अवघे जगच “ग्लोबल टू लोकल” होत चालले आहे. 

उद्याची नवकौशल्ये 
उपलब्ध माहितीचे आकलन व विश्लेषण करण्याची क्षमता: तंत्रज्ञान व उपकरणे कितीही प्रगत झाली, तरी ती मानवी बुद्धिमत्तेचे स्थान घेऊ शकत नाहीत. ती मानवी नियंत्रणाशिवाय कार्य करू शकत नाहीत. माहितीच्या क्रांतीच्या युगात इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयांवरील अब्जावधी पृष्ठे उपलब्ध आहेत. गुगलद्वारे शोधायला गेल्यास त्यातील लक्षावधी पृष्ठांच्या लिंक्स आपल्याला सापडतात. त्यांपैकी आपल्याला हवा असलेला नेमका मजकूर कमीत-कमी वेळात मिळवण्याले कौशल्य मानवामध्येच असणे क्रमप्राप्त आहे. आणि मिळालेल्या माहितीचा परिणामकारक उपयोग करण्याची क्षमताही मानवाचीच असेल. हे सर्व पाहता, माहितीचे आकलन व विश्लेषण करण्याची क्षमता अंगीकारणे आणि वाढवणे सर्व संबंधितांस आवश्यक होणार आहे.

सामाजिक संवेदनशीलता: सामाजिक जाणीवा बोथट होत चालल्याचे सर्वत्र निदर्शनास येते. आपल्या सभोवताली यंत्रे आणि उपकरणे आहेत, याचा अर्थ आपण त्यांच्याइतकेच संवेदनाशून्य व्हावे असा नाही. जागतिक पातळीवर यशस्वीरीत्या अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता आणि इतरांशी भावनिक पातळीवरून समर्थपणे जोडले जाण्याकरिता भावी पिढ्यांनी सामाजिक संवेदनशीलता जतन व संवर्धन करण्यावाचून पर्याय नसेल. 

अभिनव व अनुकूल विचारसरणी:  नव्याने अंगीकारलेले जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यांमुळे नवनवीन समस्या व प्रश्न उभे रहात असतात. अशा प्रसंगी अनपेक्षित परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या समस्यांवर आणि प्रश्नांवर प्रस्थापित चौकटीच्या व चाकोरीच्या बाहेरचा विचार करून अभिनव पद्धतीने उत्तरे शोधण्याचे कसब आत्यंतिक महत्वाचे राहील. पारंपारिक पद्धतीने विचार आणि कृती करणा-यांना या नव्या युगात स्थान असेल की नाही याबद्दल शंका येते.

सामाजिक व सांस्कृतिक वैविध्याचा स्वीकार करणारी मानसिकता: जागतिकीकरणामुळे व तंत्रज्ञानाने जग जवळ येत चालले असले तरी त्यातील सामाजिक व सांस्कृतिक वैविध्य टिकून राहणार आहे. या वैविध्यास आनंदाने स्वीकारणे व त्याचा आदर करणे जरुरीचे आहे. आपण अशा वैविध्यपूर्ण समूहांमध्येच कार्यरत असणार आहोत. या समूहांतील प्रत्येक घटकांच्या वेगळेपणाचा व वैशिष्ठ्यांचा योग्य तो सन्मान करून देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी व उन्नतीसाठी या सर्वांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे, व त्यायोगे त्यांचे योगदान प्राप्त करून घेणे अत्यावश्यक राहील. विषमतेने व संकुचित मनोवृत्तीने उभ्या केलेल्या विविध भिंती पाडून टाकण्यावाचून पर्याय राहणार नाही.  जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर याशिवाय गत्यंतर नाही. नव्वदच्या दशकामध्ये तत्कालीन पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे विलीनीकरण बर्लिनची भिंत पाडून झाले, हे या मुद्द्याचे समर्पक उदाहरण आहे. 

नव माध्यमांविषयीची साक्षरता: इंटरनेटने आणि सोशल मिडीयाने अनेक नव्या माध्यमांना जन्म दिला आहे. भावी पिढ्यांना या नव्या माध्यमांचा दैनंदिन उपयोग करून घ्यावा लागणार आहे. त्याकरिता या नव माध्यमांविषयीची साक्षरता विकसित करावी लागेल. वर्तमानपत्रांचे, मासिकांचे, व पुस्तकांचे दिवस मागे पडून ई-पेपरचे, ई-बुक्सचे, पोडकास्ट्सचे, ब्लॉग्जचे  आणि युट्यूबचे युग आलेच आहे, ते आणखी विस्तारणार आहे. वर्गातला फळा जाऊन त्याची जागा प्रॉजेक्टरने कधीच घेतली आहे. आता तीच प्रेझेंटेशन्स मोबाईलवर व टॅब्जवर दिसणे अपेक्षित होत चालले आहे. या वाढत्या व बदलत्या मागण्या पुरवायच्या असतील तर सर्वांनी माध्यम-साक्षर होणे गरजेचे राहील.

बहुविध कौशल्यांचा अंगीकार: आगामी काळातील कर्मचारी आणि कामगार हे स्वतःच्या स्वतःच्या विषयात व क्षेत्रात पारंगत असणे तर गरजेचे असेलच, पण त्याचबरोबर त्यांना इतरही अनुषंगिक विषयांत पुरेशी गती असणे अपेक्षित असेल. याकरिता चौकस बुद्धी, संशोधक वृत्ती, आणि पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जाणारी जिज्ञासू वृत्ती, हे गुण असणे आवश्यक राहील. वर उल्लेख केल्याप्रमाणे, वाढत्या आयुर्मानामुळे निवृत्ती नंतरही आपल्या आवडीच्या, भिन्न क्षेत्रात कार्यरत असणे स्वाभाविक असणार आहे. त्याकरिता अशा प्रकारची बहुविध कौशल्ये सर्वांना, सर्वत्र, सर्वकाळ उपयोगी पडणार आहेत.

सारांश काय, तर ही किमान कौशल्ये अंगी नसलेल्या व्यक्तींना या बदलत्या जगात काही स्थान राहणार नाही, असेच दिसते. असे लोक मुख्य प्रवाहातून बाजूस फेकले जाण्याची शक्यता दाट असेल.  कौशल्यवृद्धीच्या व क्षमता बांधणीच्या या दिशेने शासन यंत्रणा, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी व तांत्रिक विद्यालये, शिक्षण संस्था, अशा सर्वच पातळ्यांवरून ठोस कृती होणे आवश्यक आहे. याशिवाय, वैयक्तिक पातळीवरूनही सर्व संबंधितांनी कसोशीने प्रयत्न करून स्वतःला उद्याच्या उन्नत तंत्रज्ञानाच्या अवलंबाकरिता सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. केंद्र व राज्यातील शासनही या दिशेने आवश्यक ती पावले उचलत आहेत, उदाहरणार्थ स्कील डेव्हलपमेंट, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया, इत्यादी. पण या प्रयत्नांना समस्तांनी साथ देणे आवश्यक आहे, तरच अपेक्षित परिणाम हाती लागू शकतील. 

आपण सर्व उत्क्रांतीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत. हा संक्रमणाचा काळ आहे. त्याकरिता योग्य ती पावले उचललीच पाहिजेत, आणि आत्ताच उचलली पाहिजेत. अन्यथा आपण कालबाह्य होण्याचा धोका आहे.

Tuesday, 16 February 2016



एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी 



Friday, 1 January 2016

 सातारा जिल्हा परिषद सातारा 

सन २०१६ मध्ये प्राथमिक शाळांना घ्यावयाच्या सुट्यांची यादी

 

Friday, 12 June 2015

माझ्या प्रत्येक यश्यात अर्धा नव्हे तर संपूर्ण वाटा यांचाच आहे....





माझ्या प्रत्येक यश्यात अर्धा नव्हे तर संपूर्ण वाटा यांचाच आहे....

मला मिळालेला अत्यंत प्रतिष्ठेचा आणि राज्यस्तरीय असा यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ भूषण कृतज्ञता गौरव पुरस्कार स्वीकारताना माझी पत्नी सौ. गंगा आणि माझा मुलगा चि. अंतरीक्ष....

या कार्यक्रमाच्या वेळी मी एका शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करत असल्यामुळे मी तेथे उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल खेद वाटतो परंतु या पुरस्काराचे खरे मानकरी तेथे उपस्थित राहिले व त्यांनीच माझ्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला याचा आनंदही आहे

माऊली कुटुंबप्रमुख प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सलीम भैया मुजावर आणि प्रमुख कार्यवाह प्रा.हनमंत कराळे पाटील यांचा मी आभारी आहे या सन्मानाने माझी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा व उर्जा नक्की वाढेल यात शंका नाही....

Wednesday, 10 June 2015

'ब्लॉग रायटिंग'ने टाकली कात (व्यंकटेश कल्याणकर)

फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात "ब्लॉग रायटिंग‘ मागे पडते की काय, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. प्रदीर्घ लेखन ऑनलाइन करण्याचे नवे माध्यम म्हणून "ब्लॉग रायटिंग‘ पुन्हा नव्याने समोर येत आहे. 

- व्यंकटेश कल्याणकर

व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात आपल्याला दररोज अनेक मेसेजेस येत असतात. त्यामध्ये कधी कधी प्रदीर्घ लेखही फॉरवर्ड केले जातात. हे लेख येतात कुठून, एवढे मोठे लेख लिहितात कोण; तर हे जे लेखक मंडळी असतात ते बहुतेकवेळा "ब्लॉगर्स‘ असतात. ऑनलाइन माध्यमांत ब्लॉगवर लेखन करणाऱ्यांना "ब्लॉगर्स‘ म्हणतात. किरकोळ मर्यादा सोडल्या तर संकेतस्थळ आणि ब्लॉगमध्ये फार फरक नाही.

गुगल, वर्डप्रेससारख्या माध्यमातून आपण अगदी तासाभरात आपला ब्लॉग सुरू करू शकतो. आपल्या हव्या त्या विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. जी-मेलचा ई-मेल आयडी वापरून आपण गुगलच्या "ब्लॉगर‘ सेवेद्वारे स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकतो. एका ई-मेलवरून आपण अनेक ब्लॉग तयार करू शकतो. एका ब्लॉगवर अनेक लेख लिहू शकतो.

ब्लॉगिंगची सेवा नि:शुल्क उपलब्ध आहे. याशिवाय ब्लॉगला भेटी देणाऱ्या "व्हिजिटर्स‘च्या संख्येवरून जाहिरातीही मिळू शकतात. गुगल ऍड्‌सच्या माध्यमातून मिळणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्नही उपलब्ध होऊ शकते. मराठी भाषेत ही पद्धत अद्याप फारशी प्रचलित नाही. मात्र, पाश्‍चिमात्य देशात ब्लॉगिंग हा मोठा व्यवसाय झाला आहे. अगदी कथा, कविता, राजकारण, साहित्य, पाककृती, पर्यटन आदी विषयांवरचे ब्लॉग्ज्‌ लोकप्रिय आहेत. 

मराठीमधील ब्लॉग्ज्‌वर दर्जेदार साहित्य प्रकाशित होत राहते. प्रसार आणि प्रचाराअभावी "मराठी ब्लॉगर‘ अद्यापही काही अंशी दुर्लक्षितच आहे. मात्र, अलीकडच्या काळात राजकीय विषयांवर काहीतरी खळबळजनक लिहिणारे ब्लॉगर अल्पावधीतच लोकप्रिय होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
ब्लॉग लेखनामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये खासगी ब्लॉग, समूह ब्लॉग, संस्थेचे ब्लॉग वगैरे प्रकार करता येतात. विशेष म्हणजे फेसबुक, ट्‌विटर वगैरे म्हणजे एक प्रकारचे ब्लॉगिंगच आहे. ते मायक्रोब्लॉगिंग प्रकारात मोडते. ब्लॉगची लोकप्रियता वाढली, तर आपण विहित शुल्क अदा करून आपल्या ब्लॉगला संकेतस्थळात परावर्तित करू शकतो.

जॉन बर्गर यांची वेबलॉगची संकल्पना
जॉन बर्गर यांनी 1990 मध्ये वेबलॉग ही संकल्पना आणली. पुढे तीच ब्लॉग म्हणून नावारूपास आली.
दररोज विशिष्ट व्हिजिटर्सचा आकडा गाठला की ब्लॉगला गुगल ऍड्‌स मिळतात. अधिकृत शासकीय ब्लॉग तयार करणारा इस्राईल हा पहिला देश आहे. पाश्‍चिमात्य देशात वैयक्तिक ब्लॉगिंग हा मोठा व्यवसाय आहे.

ब्लॉग बाबत काही प्रश्न अडचणी असतील तर आपण लेखकाला +91-94042 51751 या क्रमांकावर केवळ Whats App द्वारे प्रश्न विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यात येईल. (केवळ Whats App द्वारे) 

(Courtesy: www.esakal.com)

Tuesday, 26 May 2015

एक अधूरा ख्वाब

" रोज दफ़्तर से लौटते वक़्त, 
चौखट पर बैठा हुआ मिलता था
वो कभी मुस्कुराता, कभी कुछ बुद-बुदाता, 
कभी खामोश, और कभी बेचैन सा 
वही बैठता था, मेरी चौखत पर
कौन था? पहचान नही पा रहा था उसे
सोचा पूँछू, करीब जाकर
लेकिन बचता रहा हमेशा
आज लौटा जब दफ़्तर से,
देखा बैठा था वह वही , 
थोड़ा उदास था, आँखें कुछ नम सी थी
हिम्मत कर करीब गया 
पूँछा उसे " कौन हो? "
कोई जबाब नही दिया उसने
बस एक बार देखा मेरी ओर 
और बस देखता रहा
फ़िर पुँछा मैने '' कौन हो? " 
नीद से जागा जैसे वह
बोला " पहचाना नही मुझे , 
मै तुम्हारा  एक अधूरा ख्वाब , भूल गये क्या मुझे "
मेरा एक ख्वाब ! , एक सवाल , 
एक बेचैनी सी होने लगी , 
कब देखा था, इस ख्वाब को 
और पहचान नही पाया, मिलता तो रोज था
हौसला कर ,हाथ बढ़ाया 
छुआ उसे
और ख्वाब हक़ीक़त हो गया "
                                         - " हैदर "


Thursday, 30 April 2015

पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


बघता बघता एक वर्ष संपलं... जणू काही ३६५ दिवसाचं एक स्वप्न पूर्ण झालं... चिमू तू आलीस आणि आमचं आयुष्य जणू फुलून निघालं... या एका वर्षात तू पुढील पूर्ण आयुष्यात आम्ही कधीही विसरणार नाहीत अश्या सुंदर आठवणी आम्हांला दिल्यास... तुझ ते टकमक पाहणं... तळहाताच्या मुठी आवळून हातवारे करणं... तुझं ते खरं रडणं आणि कधी कधी नाटकी रडणं... जवळ घेताच शांत होणं... तुझं ते कीडबिड बोलणं आणि वर्षाच्या आतच तुझं चालण्याच्या प्रयत्नात पडणं... सगळं काही मनमोहक मधुर अन कधी न विसारणारं...
           क्षितिजा... खरच तू रडत असतानाही मला हसावं वाटलं कारण तुझ रडणही तसच हळुवार आणि लाडिक होतं... तुझ्या प्रत्येक कृतीच्या आणि केलेल्या नखर्यांच्या पाऊलखुणा आमच्या मनावर उमटलेल्या आहेत... या एका वर्षात अनेक सुखद क्षण येऊन गेले ज्यांची मोजदाद होऊच शकत नाही... मोजदाद करण्याचा प्रयत्नही मी करणार नाही कारण मोजण्यापेक्षा जे उपभोगले तेच खरे आनंदाचे क्षण... हो या एक वर्षातील तुझ्यासोबतचे सर्व क्षण मी मनाच्या एका कोपर्यात कायमस्वरूपी कैद करून ठेवले आहेत... त्या गोड आठवणी आहेत माझ्यासाठी... माझ्या पुढील आयुष्यासाठी...
           चिमू तू हळूहळू तुझी एकेक लीला दाखवत आहेस आणि आम्ही ते पाहून हरखून जात आहोत... हातांच्या इशार्यासह तुझे पापा, बाबा, मामा, हे तोतरे शब्द ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे... रांगत तू जेंव्हा घरभर फिरतेस तेंव्हा तुझ्याकडे बघत बसावे वाटते... दिवसभर बाहेर कितीही थकून आलो तरी घरी तुझ्या हसतमुख चेहऱ्याकडे पहिले की सर्व शीण दूर होतो एवढी ताकत तुझ्या हास्यात आहे... आयुष्याच्या साऱ्या चिंता आणि जगाला विसरायला लावेल एवढी ताकत तुझ्या पैंजणाच्या किणकिणात आहे...
           एक बाहुली, परी, फुलपाखरू.... काय उपमा देऊ तुला चिमू... पाहता पाहता एक वर्षाची झालीस... आमच्या घरातील चैतन्याच्या रूपातील तू अशीच हसत खिदळत मोठी होत राहा आणि आमच्या आनंदात भर टाकीत जा...

Wednesday, 17 December 2014

टेक्नोलॉजी फोर टीचर्स - शिक्षकांसाठी खास कोर्स

       २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे (Technology) शतक मानले गेले आहे ! आणि  कॉम्पुटरही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे ! आज आपणास प्रत्येक क्षेत्रात कॉम्पुटरचा मुक्त वापर होतांना दिसतो ! कॉम्पुटरच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत ! 
      बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे कॉम्पुटरचा वापर केला जातो. आणि आता शाळेतही कॉम्पुटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्पुटरवर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे शिक्षकांनी आता स्वतःचे परिश्रम व वेळ वाचवण्यासाठी इंटरनेट, संगणक तंत्रज्ञान (Technology) या सर्व बाबतीत अपडेट राहणे आवश्यक झाले आहे. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता कॉम्पुटरचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. 
             पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला कॉम्पुटर वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका कॉम्पुटरचा प्रभाव वाढला आहे. कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. तसेच ज्यांनी आपल्या नोकरी व व्यवसायामध्ये संगणकाची जोड स्वीकारली ते लोकही आपल्या नोकरी मध्ये एक वेगळी छाप निर्माण करू शकले किंवा व्यवसायामध्ये कमालीचे यशस्वी झाल्याचे आपणास पहावयास मिळते. म्हणूनच कॉम्पुटर शिक्षणाला काळाची गरज मानले गेले आहे !
               आता शिक्षकदेखील संगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (Technology) यापासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी विशेषतः प्राथमिक शिक्षकांनी हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त अवगत करावे. आहे त्या ज्ञानात भर घालावी आणि जवळचे ज्ञान इतरांना वाटावे. या सद्हेतूने यशदा येथील तज्ञ मार्गदर्शक व्यंकटेश कल्याणकर आणि त्यांचे सहकारी यांनी खास शिक्षकांसाठी T4T (टेक्नोलॉजी फोर टीचर्स - शिक्षकांसाठी खास कोर्स) या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशदामध्ये केले आहे. शक्य होईल तेवढ्या शिक्षकांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा.